राज्यातील बहुतांश भागांत 22 जुलैपर्यंत पावसाचा जोर कमी राहणार आहे. मात्र गुजरात, मध्य प्रदेशातील अतिवृष्टीचा परिणाम म्हणून कोकण अन् मध्य महाराष्ट्रात मात्र 23 पासून पाऊस सक्रिय होत आहे.
राज्यात गेल्या तीन ते चार दिवसांपासून पाऊस कमी झाला आहे, कारण हवेचा दाब वाढला आहे. उत्तर भारतात मात्र जोरदार पाऊस सुरू आहे. राजस्थान, मध्य प्रदेश या राज्यात अतिवृष्टी सुरू आहे. मात्र, महाराष्ट्रात पाऊस कमी झाला आहे. कारण राज्यात हवेचा दाब वाढला आहे.