Monday, March 30, 2026
Homeक्रीडामुंबई इंडियन्सचा 14 वर्षांचा वनवास संपला, पहिल्या सामन्यात दणदणीत विजय

मुंबई इंडियन्सचा 14 वर्षांचा वनवास संपला, पहिल्या सामन्यात दणदणीत विजय

मुंबई इंडियन्सने 2012 नंतर पहिला सामना कधीच जिंकला नव्हता. त्यामुळे गेल्या काही वर्षात मुंबई इंडियन्स पहिला सामना गमावते असा ठप्पा लागला होता. पण यावेळी मुंबई इंडियन्सने यावेळी सर्व काही पुसून टाकलं आहे. कोलकाता नाईट रायडर्सने विजयासाठी 221 धावांचं आव्हान दिलं होतं. हे आव्हान मुंबई इंडियन्सने 19.1 षटकात फक्त 4 गडी गमवून पूर्ण केलं. यासह स्पर्धेत पहिल्या विजयाची नोंद केली. कोलकाता नाईट रायडर्स संघ या सामन्यात गोलंदाजीत पूर्णपणे फेल गेला.

 

मुंबई इंडियन्सचा 14 वर्षांचा वनवास संपला, पहिल्या सामन्यात दणदणीत विजय

मुंबई इंडियन्सचा पहिल्या सामन्यात पराभवाचा 14 वर्षांचा वनवास अखेर संपला आहे. पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्सने कोलकाता नाईट रायडर्सला 6 गडी राखून पराभूत केलं. कोलकाता नाईट रायडर्सने विजयासाठी 221 धावांचं आव्हान दिलं होतं. शेवटच्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर नमन धीरने चौकार मारला आणि मुंबई इंडियन्सने विजय मिळवला आहे. मुंबई इंडियन्स आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदाच 221 धावांचा यशस्वी पाठलाग केला आहे.

 

मुंबई इंडियन्सला चौथा धक्का, तिलक वर्मा बाद

 

मुंबई इंडियन्सला तिलक वर्माच्या रुपाने चौथा धक्का बसला. तिलक वर्मा 14 चेंडूत 20 धावा करून बाद झाला. विजयी षटकार मारण्याच्या नादात झेल बाद झाला आणि तंबूत परतला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -