Homeकोल्हापूरअखेर राधानगरी धरण १०० टक्‍के भरले! रात्री ११ वाजून ३२ मिनिटांनी क्र....

अखेर राधानगरी धरण १०० टक्‍के भरले! रात्री ११ वाजून ३२ मिनिटांनी क्र. ६ चा स्वयंचलित दरवाजा खुला झाला

गेले दोन दिवस जिल्ह्याचे डोळे लागून राहिलेले राधानगरी धरण अखेर गुरुवारी रात्री उशिरा १०० टक्‍के भरले. धरण पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर रात्री ११ वाजून ३२ मिनिटांनी क्र.६ चा स्वयंचलित दरवाजा खुला झाला असून या दरवाजातून १४२८ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे.

 

बुधवारी रात्री धरण ९९ टक्‍के भरले होते. तरीही १४०० क्युसेकचा सुरू असलेला विसर्ग आणि पावसाचा जोर ओसरल्याने गुरुवारी सायंकाळनंतरही धरण १०० टक्‍के भरले नव्हते. आता धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्यास आणखी काही दरवाजे उघडण्याची शक्यता आहे. २२ जुलैपासून धरणातून विद्युत गृहामार्फत १४०० क्युसेक पाण्याचा विसर्ग भोगावती नदीपात्रात सुरूच आहे. आता नदी पात्रात एकूण २८२८ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू झाला असल्याने नदी काठावरील ग्रामस्थांनी सावधगिरी बाळगावी, असे आवाहन जलसंपदा विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -