ईडीकडून दाखल केलेल्या मनी लाँड्रिंग प्रकरणात आमदार हसन मुश्रीफ यांनी दाखल केलेल्या अटकपूर्व जामीनावर आज (11 एप्रिल) निर्णय होणार आहे. त्यामुळे हसन मुश्रीफ यांना दिलासा मिळणार की ईडी कारवाईला सामोरे जावे लागणार? याकडे कोल्हापूर जिल्ह्यासह राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे. मुंबईतील विशेष न्यायालयाने हसन मुश्रीफ यांच्या अटकपूर्व जामीनावर सुनावणी पार पडल्यानंतर निर्णय राखून ठेवला होता. त्यामुळे ईडी प्रकरणात मुश्रीफांना अटकेपासून दिलेलं संरक्षण कायम होते.
ईडीकडून करण्यात आलेल्या दाव्यानुसार, “मुश्रीफ यांनी तपासात सहकार्य केलेलं नाही आणि तीन समन्स बजावूनही ते हजर झाले नाहीत आणि उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतरच हजर झाले. त्यांची चौकशी कोल्हापुरात नोंदवलेला एफआयआर आणि कंपनी रजिस्ट्रारने दाखल केलेल्या तक्रारीवर आधारित आहे.” सरसेनापती संताजी शुगर घोरपडे साखर कारखाना लिमिटेडचे शेअर्सच्या रुपात शेतकर्यांकडून 10 हजार रुपये घेतल्याचा आरोप आहे. 2011 मध्ये लोकसहभागातून साखर कारखाना उभारण्यासाठी निधी उभारताना मुश्रीफ यांना भांडवलाची गरज असल्याचा दावा ईडीने केला आहे.
दुसरीकडे, मुश्रीफ यांच्या अडचणीत वाढ सुरुच असून आणखी 67 शेतकऱ्यांनी कोल्हापूर पोलिसांच्या आर्थिक गुन्हे अन्वेषणकडे तक्रार दाखल केल्याने आतापर्यंत दाखल झालेल्या तक्रारींची संख्या 108 वर पोहोचली आहे. सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याचे सभासदत्व देतो, असे सांगून फसवणूक केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी मुश्रीफ यांच्यावर केला आहे. याप्रकरणी 2 एप्रिल रोजी आणखी 67 शेतकऱ्यांनी आर्थिक गुन्हे अन्वेषणकडे तक्रार केली. मुश्रीफ यांच्याविरोधात दाखल झालेल्या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे सोपवण्यात आला आहे.
दरम्यान, कोल्हापुरातील दाखल गुन्ह्यात मुश्रीफ यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिल्यानंतर या प्रकरणात 24 एप्रिलपर्यंत मुश्रीफ यांच्यावर कोणतीही कठोर कारवाई न करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे पुढील सुनावणी येईपर्यंत आता तक्रारदार शेतकऱ्यांची संख्या 108 वर गेली आहे.
दुसरीकडे, आमदार पी. एन. पाटील हे सुद्धा स्वतः ईडी कार्यालयात धडक देऊन आले आहेत. मात्र, त्यांची चौकशी होऊ शकलेली नाही. त्यांना पहिल्यांदा समन्स बजावल्यानंतर ते हजर झाले नव्हते. आता त्यांना नव्याने समन्स बजावण्यात येणार आहे. सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखाना आणि गडहिंग्लज तालुक्यातील अप्पासाहेब नलवडे सहकारी साखर कारखाना (गोडसाखर) कर्जपुरवठा प्रकरणी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर ईडीकडून छापेमारी करण्यात आली आहे. या संदर्भात आतापर्यंत ईडीकडून जिल्हा बँकेचे अध्यक्ष असलेल्या मुश्रीफ यांच्यावर तीन वेळा छापेमारी करण्यात आली आहे.
तसेच कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पाच अधिकाऱ्यांची सुद्धा चौकशी करण्यात आली आहे. तसेच तीन माजी संचालकांची चौकशी करण्यात आली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आता कोल्हापूर जिल्ह्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार पी. एन. पाटील यांनाही समन्स बजावले जाणार आहे.
हसन मुश्रीफांच्या अटकपूर्व जामीनावर आज फैसला!
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -