भारतीय शेअर बाजारात 28 जुलै ते 1 ऑगस्ट या कालावधीत मोठ्या घडामोडी पाहायला मिळाल्या. यामुळे सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 7 कंपन्यांना मोठा फटका बसला. सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 7 कंपन्यांचं बाजारमूल्य 1.35 लाख कोटी रुपयांनी घसरलं. टाटा कन्सलटन्सी सर्व्हिसेसचं सर्वाधिक नुकसान या पाच दिवसात झालं. या आठवड्यात सेन्सेक्समध्ये 863.18 अंक किंवा 1.05 टक्क्यांची घसरण झाली.
या कंपन्यांचं सर्वाधिक नुकसान
TCS, भारती एअरटेल, ICICI बँक, भारतीय स्टेट बँक (SBI), इन्फोसिस, भारतीय जीवन विमा निगम (LIC) आणि बजाज फायनान्सचं बाजारमूल्य 1,35,349.93 कोटी रुपयांनी कमी झालं आहे. दुसरीकडे रिलायन्स इंडस्ट्रीज, एचडीएफसी बँक आणि हिंदुस्तान यूनिलीवरचं बाजारमूल्य वाढलं आहे. यापैकी एचडीएफसी बँक आणि हिंदुस्तान यूनिलीवरचं बाजारमूल्य 39,989.72 कोटी रुपयांनी वाढलं.
कोट्यवधी रुपयांचं नुकसान
या दरम्यान TCS चं बाजारमूल्य 47,487.4 कोटी रुपयांनी घसरुन 10,86,547.86 कोटी रुपयांवर आलं. भारती एअरटेलचं बाजारमूल्य 29,936.06 कोटी रुपयांनी घसरुन 10,74,903.87 कोटी रुपये झालं. बजाज फायनान्सचं बाजारमूल्य 22,806.44 कोटी रुपयांनी घसरुन 5,44,962.09 कोटी रुपये झालं. इन्फोसिसचं बाजारमूल्य 18,694.23 कोटी रुपयांनी घसरुन 6,10,927.33 कोटी रुपये झालं. यास स्टेट बँक ऑफ इंडियाचं बाजारमूल्य 11,584.43 कोटी रुपयांनी घसरुन 7,32,864.88 कोटी राहिलं आहे. आयसीआयसीआय बँकेचं बाजारमूल्य 3,608 कोटी रुपयांनी कमी होऊन 10,50,215.14 कोटी रुपये झालं. LIC ची मार्केट कॅप 1,233.37 कोटी रुपयांनी कमी होऊन 5,59,509.30 कोटी रुपये राहिली.