Friday, March 29, 2024
Homeकोल्हापूरराज ठाकरे पाच वर्षांनी उद्या कोल्हापूर दौऱ्यावर; जोरदार स्वागतासाठी जय्यत तयारी

राज ठाकरे पाच वर्षांनी उद्या कोल्हापूर दौऱ्यावर; जोरदार स्वागतासाठी जय्यत तयारी

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) (Maharashtra Navnirman Sena) अध्यक्ष राज ठाकरे तब्बल पाच वर्षानंतर मंगळवारी कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत.मनसेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी ठाकरे यांच्या दौऱ्याची माहिती दिली. मंगळवारी दुपारी 4 वाजता ते आल्यानंतर ताराबाई पार्क येथील शासकीय सर्किट हाऊस येथे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधतील. ते मनसे समर्थकांशी संवाद साधतील आणि शासकीय सर्किट हाऊसमध्ये येणार्‍या जुन्या मित्रांना भेटतील.

दुसऱ्या दिवशी बुधवारी राज ठाकरे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करतील आणि त्यानंतर शाहू महाराजांच्या स्मारकाला अभिवादन करतील. कोकण दौऱ्यावर जाण्यापूर्वी ते अंबाबाई मंदिरात भेट देणार आहेत. त्यानंतर दुपारी ते सावंतवाडीकडे रवाना होतील. सायंकाळी पाच वाजता सावंतवाडी येथे पोहोचतील. कुडाळ येथे मुक्काम असेल. राज ठाकरे 30 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर 2022 या कालावधीत सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर आहेत‌.

स्थानिक पदाधिकाऱ्यांना महत्त्वाचे मुद्दे, संघटनात्मक समस्या आणि जिल्ह्यातील पक्षाची स्थिती याबाबत तयार राहण्यास सांगण्यात आले आहे. मनसेच्या एका वरिष्ठ नेत्याच्या म्हणण्यानुसार, पक्षाचे कार्यकर्ते ठाकरे यांना स्वतंत्रपणे किंवा पक्षाच्या संभाव्य नवीन मित्र भाजपसोबतच्या युतीसह निवडणुका लढवण्याची परवानगी देण्यास सांगतील. पक्षाचे कार्यकर्ते त्यांना निवडणुकीपूर्वी जाहीर सभेला संबोधित करण्याची विनंती करतील.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गेल्या काही दिवसांपासून पक्षातील पदाधिकाऱ्यांची चांगलीच कानउघाडणी केली. मनसेच्या बैठकीत राज ठाकरे यांनी काम न करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले आहेत. त्यामुळे कोल्हापूरमधील मनसैनिकांना ते काय कानमंत्र देणार? याकडे लक्ष लागले आहे.

राज ठाकरेंकडून निवडणुकीचं भाकित

दरम्यान,राज्यात लवकरच निवडणुका लागतील असं भाकित राज ठाकरे यांनी वर्तवलं आहे. राज ठाकरे यांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण आलं आहे. राज्यात लवकरच कोणत्या निवडणुका होणार आहेत, याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत. “मी आता भाषणाला उभा नाही. मी सध्या घशाला आराम देतो. कारण जानेवारीपासून बोंबल बोंबल बोंबलायचंच आहे. निवडणुका लागतील. घसा एवढ्यासाठीच बोललो कारण गळा हा लता मंगेशकर वगैरे या लोकांसारखा असतो. घसाच आपला असतो. त्यामुळे घशाला जरा आराम देतोय,” असं राज ठाकरे म्हणाले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -