Sunday, July 6, 2025
Homeब्रेकिंगआम्ही बहुमतही सिद्ध करु...उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री आहेत आणि राहतील'

आम्ही बहुमतही सिद्ध करु…उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री आहेत आणि राहतील’

ताजी बातमी ऑनलाईन टीम

विधान परिषद निवडणुकीनंतर राज्यातील उद्धव ठाकरे सरकार अडचणीत आले आहे. शिवेसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड पुकारल्यामुळे राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप झाला आहे. एकनाथ शिंदे यांचा बंड शमवण्यासाठी शिवसेनेचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. शिवसेना नेते मिलिंद नार्वेकर आणि रवींद्र फाटक (Ravindra Phatak) यांनी मुख्यमंत्र्याचा निरोप घेऊन सुरतमध्ये एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. एकनाथ शिंदे आणि मिलिंद नार्वेकर यांच्यात जवळपास एक तास चर्चा झाली. मात्र, एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेसमोर 4 अटी ठेवल्या. शिवसेनेने भाजपसोबत युती करावी, शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबतची आघाडी तोडावी आणि आपण गटनेतेपदी कायम राहणार अशा शिंदे यांच्या अटी आहेत.



दरम्यान एकनाथ शिंदे यांनी आज आपल्यासोबत 40 आमदार असल्याचा दावा केला आहे. तसेच आणखी 10 आमदार आपल्याकडे येणार असल्याचे त्यांनी सांगतिले. शिंदे आणि त्यांच्यासोबतचे सर्व आमदार मंगळवारी गुजरातच्या सुरत (Surat, Gujarat) शहरातील दी ग्रँड भगवती हॉटेलमध्ये थांबलेले होते. त्यांना आता गुवाहाटी येथे हलवण्यात आले आहे. हे सर्व आमदार भाजपच्या संपर्कात आहेत. शिंदेनी पुकारलेल्या या बंडामुळे माहाविकास आघाडी सरकार संकटात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -