Sunday, February 22, 2026
Homeक्रीडापाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात उतरताच Virat Kohli पूर्ण करणार टी-20 सामन्यांचे शतक

पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात उतरताच Virat Kohli पूर्ण करणार टी-20 सामन्यांचे शतक


दुबई इंटरनॅशनल स्टेडियमवर रविवारी आशिया चषक स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्या सामन्याने गट अ मोहिमेला सुरुवात करेल. या सामन्यासोबत क्रिकेट विश्वातील ‘सर्वात मोठी टक्कर’ पुन्हा सुरू होईल. हा सामना भारतीय फलंदाज विराट कोहलीचा 100 वा टी-20 सामना असेल. दीड महिन्याच्या विश्रांतीनंतर कोहली भारतीय संघात पुनरागमन करण्याच्या तयारीत आहे. विराट कोहलीने हे मान्य केले की त्याला मैदानावर पूर्वीप्रमाणे उर्जावान जाणवत नव्हते. त्यासाठी त्याने स्वत:ला प्रेरित केले.

बीसीसीआयने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट केलेल्या संपूर्ण मुलाखतीचा टीझरमध्ये एका छोट्या व्हिडिओमध्ये कोहली म्हणाला “हे मला कधीही असामान्य वाटले नाही. संघाबाहेरील आणि संघातील बरेच लोक मला विचारतात की तुम्ही तुमची उर्जा कशी राखता. मी फक्त एक साधी गोष्ट सांगतो, मला माझ्या संघाला कोणत्याही किंमतीत जिंकून द्यायचे आहे.

कोहली पुढे म्हणाला, “लोक मला विचारतात की तू मैदानावर याचा सामना कसा करतोस आणि तू इतक्या उर्जेने कसा पुढे जातोस. मला त्यांना एवढंच सांगायचं आहे की मला क्रिकेट खेळायला आवडतं आणि माझं या वास्तवावर प्रेम आहे की माझ्याकडे प्रत्येक चेंडूसाठी खूप योगदान आहे. मी माझी सर्व शक्ती मैदानावर देईन.”

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -