T20 वर्ल्ड कप 2022 मधील आज दुसरा सेमीफायनल सामना होणार आहे. टीम इंडिया आणि इंग्लंडमध्ये ही लढत होणार आहे. काल सेमीफायनलचा पहिला सामना झाला. यात पाकिस्तानने न्यूझीलंडवर 7 विकेट राखून सहज विजय मिळवला. आज टीम इंडिया मेलबर्नच तिकीट मिळवण्याच्या उद्देशाने मैदानात उतरेल. ग्रुप 2 मध्ये टीम इंडियाने फक्त दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा सामना गमावला होता. या ग्रुपमध्ये टीम इंडिया 8 पॉइंटसह टॉपवर होती.
टॉस कोणी जिंकला?
इंग्लंडचा कॅप्टन जोस बटलरने टॉस जिंकून पहिली फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. इंग्लंडचा प्रमुख गोलंदाज मार्क वुड दुखापतीमुळे या मॅचमध्ये खेळत नाहीय. डेविड मलानही फिटनेसमध्ये अपयशी ठरला. मार्क वुड, डेविड मलानच्या जागी फिल सॉल्ट आणि ख्रिस जॉर्डनचा टीममध्ये समावेश करण्यात आलाय.
टीम इंडियात एक बदल
टीम इंडियाने आज आपल्या टीममध्ये एक महत्त्वाचा बदल केलाय. दिनेश कार्तिकच्या जागी ऋषभ पंंतचा टीममध्ये समावेश केलाय.