Thursday, June 26, 2025
Homeकोल्हापूरकोल्हापूर विमानतळही अलर्ट मोडवर

कोल्हापूर विमानतळही अलर्ट मोडवर

पाकिस्तानवर केलेल्या एअर स्ट्राईकनंतर कोल्हापूर विमानतळही अलर्ट मोडवर आले आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाकडून सज्जतेबाबत बुधवारी दुपारी कोल्हापूर विमानतळ प्रशासनाची समन्वय साधण्यात आला.

 

यामुळे भविष्यातील कारवाईत कोल्हापूर विमानतळही महत्त्वाची भूमिका बजावण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

 

पहलगाम येथे दि.22 एप्रिल रोजी पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या नऊ केंद्रांवर एअर स्ट्राईक केला. या स्ट्राईकने संपूर्ण जगाला संदेश देत भारताने दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले. बुधवारी पहाटे झालेल्या या कारवाईनंतर दिवसभर देशातील महत्त्वाच्या विमानतळांना अलर्ट करण्यात आले आहे.

 

भारताच्या पश्चिम किनारपट्टीपासून अवघ्या 120 किलोमीटर अंतरावरील सर्वाधिक सुरक्षित आणि महत्वाचे विमानतळ अशी कोल्हापूर विमानतळाची ओळख आहे. कोल्हापूरपासून अर्धा ते एक तासाच्या हवाई अंतरावर भारतीय नौदलाचे मुंबई, गोवा आणि कारवार हे तीन महत्त्वाचे तळ आहेत. भविष्यात पाकिस्तानवर समुद्रमार्गे कारवाईची शक्यता निर्माण झाली, तर या तीन तळाची सर्वात महत्त्वाची भूमिका असणार आहे. या सर्व पार्श्वभूमीवर गरज भासल्यास कोल्हापूर विमानतळाचाही वापर होऊ शकतो.

 

कोल्हापूर विमानतळावर यापूर्वीही नौदल आणि वायुदलाच्या विमानांनी सराव केला आहे. दोन वर्षांपूर्वी भारतीय वायुदलाच्या विमानाने कोल्हापूर विमानतळावर ‘टच अँड गो’चाही सराव केला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर पाकिस्तानातील दशहतवाद्यांच्या नऊ अड्ड्यावर झालेल्या एअर स्ट्राईकनंतर विविध विमानतळांच्या सज्जतेबाबत आढावा घेण्यात आला आहे. त्यात कोल्हापूरचा समावेश होता. यामुळे कोल्हापूर विमानतळाचे महत्त्व अधोरेखित झाले आहे.

 

विमानतळाची वैशिष्ट्ये

 

हवाई दल, नौदलाच्या विमानाच्या टेक ऑफ, लँडिंग होऊ शकते

 

नाईट लँडिंगची सुविधा असल्याने रात्रभरही विमानतळाचा वापर

 

पाऊस आणि धुक्यातही सुरक्षित लँडिंग, टेकऑफ करण्याची सुविधा

 

चांगले हवामान असणार्‍या विमानतळापैकी एक विमानतळ

 

भारतीय किनारपट्टीपासून जवळच्या अंतरावरील विमानतळापैकी एक

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -