जिल्ह्यातील राधानगरी धरणात 236. 08 दलघमी पाणीसाठा आहे. सकाळी 7 वाजताच्या अहवालानुसार राधानगरी धरणाचा स्वयंचलित दरवाजा क्र. 6 खुला असून सध्या धरणातून 3028 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
पंचगंगा नदीवरील- शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड व शिरोळ, भोगावती नदीवरील- खडक कोगे, कासारी नदीवरीलयवलूज, वारणा नदीवरील- चिंचोली, माणगाव व तांदुळवाडी, दुधगंगा नदीवरील- दत्तवाड असे 13 बंधारे पाण्याखाली आहेत.
आपल्या जिल्ह्यातील धरणांमध्ये पुढीलप्रमाणे पाणीसाठा आहे. राधानगरी 236. 08 दलघमी, तुळशी 98. 01 दलघमी, वारणा 924. 91 दलघमी, दूधगंगा 648. 58 दलघमी, कासारी 77. 52 दलघमी, कडवी 71. 24 दलघमी, कुंभी 75. 10 दलघमी, पाटगाव 100. 98 दलघमी, चिकोत्रा 43. 12 दलघमी, चित्री 53. 21 दलघमी, घटप्रभा 44. 05 दलघमी, आंबेआहोळ 30. 98, जंगमहट्टी, जांबरे, कोदे लघु प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला आहे.
तसेच बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे आहे. राजाराम 18. 8 फूट, सुर्वे 19. 4 फूट, रुई 47. 9 फूट, इचलकरंजी 46 फूट, तेरवाड 43. 4 फूट, शिरोळ 35. 6 फूट, नृसिंहवाडी 38 फूट, राजापूर 23. 9 फूट तर नजीकच्या सांगली 12. 6 फूट व अंकली 16. 6 फूट अशी आहे.