Sunday, August 3, 2025
Homeकोल्हापूरआता महाभारत घडणार, वाईटाचा नाश होणार : खा. धनंजय महाडिक

आता महाभारत घडणार, वाईटाचा नाश होणार : खा. धनंजय महाडिक

ताजी बातमी ऑनलाईन टीम

कोल्हापूर ; ‘आमचं ठरलंय’ म्हणणाऱ्यांनी कूटनीती, कपटनीती करून लोकसभा निवडणुकीत माझा घात केला. आमचे सरकार आल्यावर तुम्हाला झेपणार नाही, असे मी याच व्यापिठावरून म्हणालो होतो. आता तसेच घडले आहे. आमचे सरकार आलेय. यापुढे महाभारत होणार आहे. यात वाईटाचा नाश होणार असल्याचा घणाघात खा. धनंजय महाडिक यांनी शुक्रवारी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष आ. सतेज पाटील यांचे नाव न घेता केला.

धनंजय महाडिक युवा शक्तीच्या वतीने दसरा चौकात आयोजित केलेल्या दहीहंडी कार्यक्रमात ते बोलत होते. राज्यसभेच्या निवडणुकीत भाजपच्या आशीर्वादाने आपण अवघड असा सहावा थर रचला. भाजपच्या नेत्यांमुळेच हे शक्य झाले. विधानसभा, लोकसभा त्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत महाडिक परिवाराला आणि भाजपलाही पराभवाला सामोरे जावे लागले. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नैराश्य आले होते. राजकारणात कोण कायमचा शत्रू नसतो. सूर्यास्त झाल्यानंतर सूर्योदय नक्कीच होत असतो.

सर्व सत्तास्थाने गेल्यानंतर ‘आमचं ठरलंय’ म्हणणाऱ्यांनी त्रास देण्यास सुरुवात केली. पंढपूरमधील कारखान्याचे दीड हजार सभासद रद्द केले. राजाराम साखर कारखान्याचे एक हजार सभासद रद्द केले. आमचा कारखाना, शिक्षण संस्था प्रशासनावर दबाव आणून बंद पाडण्याचा प्रयत्न केला. माझ्यावर व कार्यकर्त्यांवर खोटे आरोप करून गुन्हे दाखल करयात आले. माझ्यावर 14 केसेस केल्या. मी काय गुन्हेगार आहे काय? त्यामुळे कार्यकर्तेदेखील अस्वस्थ होते, असेही महाडिक म्हणाले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -