Saturday, July 27, 2024
Homeआरोग्यविषयकहिवाळ्याच्या हंगामात ‘या’ खास पदार्थांचा आहारात समावेश करा!

हिवाळ्याच्या हंगामात ‘या’ खास पदार्थांचा आहारात समावेश करा!

ताजी बातमी ऑनलाइन टीम

हिवाळ्याचा हंगाम सुरू झाला आहे. या ऋतूत थोडासा निष्काळजीपणा आजारी पाडू शकतो. अशा परिस्थितीत थंडीपासून शरीराचा बचाव करण्यासाठी बरेचजण लोकरीचे कपडे घालतात. परंतु अनेक वेळा शरीर आतून अशक्त असते. तेव्हा खूप थंडी जाणवते आणि लोकरीचे कपडे देखील थंडीपासून बचाव करू शकत नाहीत. हिवाळ्याच्या हंगामात आपण काही पदार्थ आहारामध्ये समाविष्ट केली पाहिजेत. ज्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढू शकते आणि या हंगामात देखील आपण निरोगी राहू शकता.

या हंगामात आपण आपल्या आहारामध्ये जवसाचा समावेश केला पाहिजे. हे ओमेगा 3 फॅटी ऍसिडने समृद्ध आहे. याचे सेवन केल्याने तुमचे शरीर आतून उबदार राहते. डायबिटीज, बीपी, सांधेदुखी, ह्रदयाचा त्रास इत्यादी आजारांनी त्रस्त असलेल्यांनी हिवाळ्यात जवस नक्की खावे.

खजूरमध्ये कॅल्शियम, सेलेनियम, मॅंगनीज, फायबर आणि तांबे भरपूर प्रमाणात असतात. हिवाळ्यात हे खाल्ल्याने पचनाच्या समस्यांपासून आराम मिळतो, तसेच रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते.

शेंगदाणे हा पोषक तत्वांचा खजिना मानला जातो. प्रथिने, जीवनसत्त्वे, जस्त, लोह समृद्ध शेंगदाणे असतात. तसेच, शेंगदाण्यात मोनोअनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड आढळतात, जे खराब कोलेस्ट्रॉल कमी करतात आणि चांगले कोलेस्ट्रॉल वाढवतात. हिवाळ्यात रोज किमान मूठभर शेंगदाणे खाल्ल्याने शरीर निरोगी राहते.

गूळ ही अशीच एक गोष्ट आहे जी प्रत्येक स्वयंपाकघरात सहज मिळते. गूळ खूप गरम असतो. गूळ खाण्यास चविष्ट तर आहेच, पण ते औषध म्हणूनही काम करते. गूळ तुमचे शरीर उबदार ठेवते आणि तुमची चयापचय सुधारते. शरीरातील रक्ताची कमतरता दूर करण्यासाठी गूळ फायदेशीर आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -