आज विज्ञानाच्या जोरावर मानवाने मोठी प्रगती केली आहे. पण अजूनही गाव-खेड्यात तसेच काही ठिकाणी शहरातही अनेक लोक अंधश्रद्धेला बळी पडल्याचे प्रकार समोर येतात.
कोल्हापुरात तर सध्या एक अजब प्रकार समोर आला आहे. पतीपासून सोडचिठ्ठी मिळावी यासाठी पत्नीने एक अघोरी प्रकार केला आहे. या घटनेची सध्या जिल्हाभरात चर्चा होत आहे.
एका महिलेना आपल्या पतीपासून आपली सुटका व्हावी. पतीपासून सोडचिठ्ठी मिळावी म्हणून तिने स्मशानभूमीत एक चिठ्ठी लिहून टाकली टाकली आहे.
या चिठ्ठीसोबत काळी बाहुली लिंबू आणि अन्य साहित्य दिसून आलंय.कोल्हापूरच्या भुदरगड तालुक्यातील कुर येथून हा प्रकार समोर आला आहे. ही चिठ्ठी पाहून घडलेला प्रकार नेमका कोणी केला, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
विशेष म्हणजे लोकांनी जी चिठ्ठी सापडली आहे, त्यात अन्य तीन महिलांच्या नावांचाही समावेश आहे. ग्रामस्थ एका व्यक्तीच्या अंत्यविधीसाठी गेले होते. त्यावेळी ग्रामस्थांच्या निदर्शनास हा प्रकार आला.