Tuesday, March 19, 2024
Homeअध्यात्मघरामध्ये काढा ही शुभ चिन्हे : सर्व वास्तू दोष आणि कटकटी दूर होतील...

घरामध्ये काढा ही शुभ चिन्हे : सर्व वास्तू दोष आणि कटकटी दूर होतील :श्री स्वामी समर्थ



मित्रांनो आपल्या घरामध्ये ही शुभचिन्हे काढा. घरातील वास्तुदोष दूर करा आणि आपल्या घरामध्ये सर्व नकारात्मक ऊर्जा नष्ट करा व आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा वाढू द्या. त्यासाठी आपल्या घरामध्ये कोणती शुभ चिन्ह काढली पाहिजे ते आज आपण पाहणार आहोत.

मित्रांनो वास्तुशास्त्रानुसार घराच्या भिंतीवर काही शुभचिन्हे लावता येतात. त्यामुळे घराचे वास्तु दोष दूर करता येतात चला तर जाणून घेऊया अशा शुभ चिन्हांच्या. ही चिन्हे घरात लावल्यामुळे घरात सुख शांती समृद्धी सुद्धा वाढते.

वास्तुशास्त्र प्रामुख्याने घराच्या दिशांची काळजी प्रामुख्याने घेतली जाते. कधी कधी घराची रचना अशी असते की त्यामध्ये बदल करण्यास शक्य नसते. अशा परिस्थितीत घरात असे काही चिन्हे काढतात की त्यामुळे घरातील वास्तुदोष दूर करता येतो.

तर मित्रांनो प्रत्येक सणासुदीला घराच्या मुख्य दरवाजावर शेंदूराने शुभ लाभ काढण्याची पद्धत आहे आणि आपण ते करायला पाहिजे. त्यामुळे घरातील वास्तुदोष नष्ट होऊ शकतो. आपल्या घरामध्ये नकारात्मक शक्ती येत नाही.

घरात सर्व काही शुभमंगल होतं. त्यामुळे नकारात्मक शक्तींचा नायनाट होतो. म्हणून घराच्या मुख्य दरवाजावर स्वस्तिक चिन्ह काढणे प्रत्येक घरासाठी आवश्यक आहे.

मित्रांनो घराच्या मुख्य दारावर हळदीचे ठिपके द्यावेत त्यामुळे घरात सुख आणि समृद्धी येते. हळदीला मांगल्याचे शुभतेचे प्रतीक मानले जाते. पिवळा रंग हा बृहस्पती किंवा गुरू ग्रहाचे प्रतिनिधित्व करतो.

हळद सुख समृद्धी आणि सौख्याचे प्रतीक आहे त्यामुळे घरातील रोगांचा नायनाट होतो. प्रत्येक घरासाठी हे चिन्ह काढणे आवश्यक आहे.

मित्रांनो ओम हे परमपिता ब्रह्माचे प्रतीक आहे. हे चिन्ह घरात ठेवल्यामुळे एक प्रकारची सकारात्मक ऊर्जा निर्माण होते.
मित्रांनो मीन च्या प्रत्येक चिन्हाला घराच्या उत्तर दिशेस ठेवावेत.

असं केल्याने धनलाभ होतो. मिनचे प्रतिकृती चिन्ह ठेवायचे नसल्यास आपण फिश एक्वेरियम म्हणजेच माशाची पेटी घेऊ शकता. या घरात पैसे वाढतात.

मित्रांनो शास्त्रानुसार श्री गणेशा आराध्यदेव आहेत. सर्वप्रथम त्याची उपासना केली जाते. घराच्या मुख्य दारावर श्री गणेश यांचे चित्र लावल्यामुळे घरात सौख्य आणि समृद्धी प्राप्त होते.

मित्रांनो घराचे मुख्य प्रवेशद्वार दक्षिण दिशेस असल्यास घराच्या मुख्य चौकटीवर पंचमुखी हनुमानाचे चित्र लावावे.
मित्रांनो घराच्या मुख्य द्वाराजवळ नमस्कार शुभचिन्हे ठेवल्यास किंवा काढण्यास त्याचे खूप सकारात्मक परिणाम आपल्याला म्हणतात. नकारात्मक ऊर्जेचा नायनाट होतो.

मित्रांनो आपल्या घरात शुभचिन्हे जरूर लावा. त्यामुळे वास्तुदोष नष्ट होतात आणि घरात सुख संपत्ती शांती घरात नांदते.

मित्रांनो वरील उपाय अनेकांनी करून पाहिले आहेत. त्यांना निश्चित असे यश प्राप्त झाले आहे.

वरील माहितीही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती.

अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

RELATED ARTICLES
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -