Saturday, July 27, 2024
Homeकोल्हापूरअखेर राधानगरी धरणाचा दरवाजा सहा तासानंतर झाला बंद; पुराचे संकट टळले

अखेर राधानगरी धरणाचा दरवाजा सहा तासानंतर झाला बंद; पुराचे संकट टळले

ताजी बातमी ऑनलाईन टीम

राधानगरी धरणाचा मुख्य दरवाजा जलसंपदा विभागाच्या कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रमानंतर बंद करण्यात यश मिळविले. शर्थीच्या प्रयत्नानंतर धरणाचा दरवाजा तब्बल सहा तासांनी दुपारी 3.10 वाजता बंद झाला. दरवाजा बंद झाल्याने विसर्ग बंद झाला आहे. राधानगरी धरणाचा दरवाजा उघडल्याने पाणीपातळीत अचानक वाढ झाली.

आज सकाळी पावणे नऊच्या सुमारास राधानगरी धरणाच्या दरवाज्याचे तांत्रिक काम सुरु असताना दरवाजा १८ फूट पूर्ण उघडून अडकला. त्यामुळे नदी पात्रात पाण्याचा अचानक विसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला. यामुळे पंचगंगेसह अनेक नद्यांच्या पाणी पातळीत दिवसभरात मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे.

तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्यासाठी जलसंपदा विभागाची यंत्रणा जोरात कामाला लागली आहे. दुरुस्तीसाठी अनेक पथके रवाना झाली आहेत. नदीतील पाणी वाढणार असल्याने दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे.

गुरुत्वाकर्षणाच्या सिद्धांतावर आधारित पाणी सोडण्याची व्यवस्था आणि पाण्याच्या दबावावर उघड-झाप होणार्‍या स्वयंचलित दरवाजांचे वैशिष्ट्य असणारे राधानगरी धरण देशातील अजोड आणि एकमेव आहे. कोल्हापूर शहरापासून ३५ मैल अंतरावर राधानगरी गावाच्या पुढे भोगावती नदीचा प्रवाह अडवून हे अद्भुत धरण बांधले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -