Saturday, July 27, 2024
Homeअध्यात्मघराची नजर काढून ही वस्तू होळीच्या अग्नीत टाका :  सर्व अडचणी संपतील..

घराची नजर काढून ही वस्तू होळीच्या अग्नीत टाका :  सर्व अडचणी संपतील..

मित्रांनो, आपल्या घरामध्ये सर्व काही सुरळीत चाललेल्या असते. परंतु काहींची नजर दोष लागतो किंवा काही लोक आपल्यावर बाधा करतात की ज्यामुळे आपल्या घरावर अनेक प्रकारचे संकटे अडचणी येतात. याच अडचणी दूर करण्यासाठी आपल्याला होळीच्या दिवशी एक उपाय करायचा आहे. तो उपाय कधी करावा? कसा करावा? याबद्दलची सर्व माहिती आजच्या या लेखातून आपण जाणून घेणार आहोत.

 

आपल्या सर्वांनाच माहीत असेल की होळी हा सण वाईटावर चांगल्याची विजय मिळवणारा सन मानला जातो. असे म्हणतात की या होळीच्या अग्नीमध्ये आपला सर्व वाईट गोष्टी जळून खाक होता व आपण आपले जीवन नव्याने सुरू करू शकतो. या होळीच्या अशा या दिवशी आपल्याला आपला घरासाठी एक उपाय करायचा आहे.

 

की जेणेकरून आपल्या घरावर असलेले सर्व संकट निघून जातील. कुणाची वाईट नजर लागलेले असेल तर ती देखील होळीच्या अग्नीत जळून खाक होईल. तसेच ज्या काही नकारात्मक शक्ती असतील त्या निघून जातील व बाधा निघून जातो. घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी राहील. घरात पैसा बरकत होईल. घरामध्ये कसल्याही प्रकारची वाद-विवाद होणार नाही.

 

सर्व लोक सुखी समाधानी राहतील. तसेच घरातील व्यक्तींचे आरोग्य देखील चांगले राहील. यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे. हा उपाय करण्यासाठी घरातील महिलांनी एक नारळ घ्यायचा आहे. हा नारळ सोललेला नसावा. अखंड असावा. हा असा नारळ घेऊन आपण घराबाहेर यायचे आहे आणि घराबाहेर आल्यानंतर ज्याप्रमाणे आपण आरती ओवाळतो त्याप्रमाणे आपल्याला हा नारळ आपल्या घरावरून ओवाळून घ्यायचा आहे.

 

असे हे आपल्याला सात वेळा ओवाळून घ्यायचे आहे. त्यानंतर हा नारळ आपण पुन्हा घरात आणायचा नाही. तो सरळ होळीमध्ये नेऊन टाकावा. पण एक लक्षात घ्या की होळी ही पेटती असली पाहिजे. जर आपण हा उपाय सकाळी केला तर हा नारळ आपण घराबाहेरच ठेवून द्यायचा आहे.

 

आणि ज्या वेळेला होळी पेटतील त्यावेळेला तो त्यामध्ये टाकायचा आहे. आणि जर आपण संध्याकाळी हा उपाय केला तर डायरेक्ट ओवाळून होळीमध्ये टाकावा. अशा प्रकारे आपला घरावर असलेली सर्व नजर दोष, बाधा, नकारात्मक शक्ती त्या होळीच्या अग्नीमध्ये जळून खाक होते.

 

तुम्ही देखील नक्कीच हा उपाय करून बघा. नक्कीच तुमच्या घरावर आलेले सर्व संकट दूर होईल. घरातील नकारात्मक शक्ती घरातून बाहेर जाईल व घरात सुख समृद्धी राहील.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -